सावदा येथे शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये बांधकाम विभागाची फजिती

वाहतूक कोंडीची महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केली नाराजी व्यक्त

सावदा प्रतिनिधी..
पोलीस विभागाच्या वतीने बुधवार २० रोजी संध्याकाळी ५ वाजता जेहरा मॅरेज हॉल सावदा येथे गणेश उत्सव,दुर्गा उत्सव, ईद-ए-मिलाद हे विविध सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय सामाजिक पदाधिकारी ,पोलीस पाटील शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सावदा ते फैजपूर या महामार्गावर सावदा नजिक साईबाबा मंदिराजवळील भले मोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून बऱ्याच वेळा लहान मोठे अपघात झालेले आहे. यामध्ये अतिशय गंभीर दुखापती होऊन अपघातात जीवित हानी झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांच्याकडे सावदा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी खड्डे बुजवण्यासंदर्भात,कायमची दुरुस्ती करण्यासंदर्भात मागणी करून सुद्धा बऱ्याच दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा काल शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये उद्रेक होऊन सावदा शहरातील अक्षय सरोदे व सचिन माळी या दोघ तरुणांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सावदा उपविभागीय अभियंता व्हि. के. तायडे यांना संतप्त सवाल विचारत खड्डे दुरुस्ती कधी होणार विचारले असता, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला असल्याने आम्ही त्यांच्याशी बोलून किंवा आपले स्वतः बोलने करु संदर्भात खड्डे बुजवण्यासाठी कारवाई करू असा वेळ मारून नीला तरीदेखील तरुणांचे समाधान न झाल्याने या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सदर मागणीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला वेळीच तहसीलदार बंडू कापसे यांनी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधून सावदा शहरा जवळील खड्डे बुजवण्यात येतील व कायमचा मार्ग काढण्यात येईल असे सांगत सदर विषयावर पडदा टाकला.
यावेळी सतपंथ मंदिर फैजपूर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सावदा फैजपूर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट नगर,टनकाटा असून अवजड वाहने ट्रक यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संपूर्ण रस्ता हा ट्रक यांनी महामार्गाच्या कडेला, महामार्गाच्या बाजूला उभे करत असतात.वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागते या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात लहान मोठे अपघात होतात याबाबत देखील लक्ष देण्याची गरज असून याच्यावर समन्वयातून कायम तोडगा निघावा अशी मागणी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *