बैठकीत अधिकाऱ्यांवर काढला नागरिकांनी रोष; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग आठ दिवसात दुरुस्त करण्याची अधिकाऱ्यांकडून ग्वाही

सावदा( प्रतिनिधी ). गत आठवड्यापासून सावदा – फैजपुर रस्ता दुरुस्ती संदर्भात सावदा पत्रकारांनी नागरिकांच्या वाढत्या तक्रारी वरून जनहित लक्ष्यात घेत. दी 23 रोजी पत्रकार यांनीआक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून उतरले .या महत्वपूर्ण विषयाला अधिकारी पत्रकार व नागरिक याच्या झालेल्या बैठकीत स्वल्प विराम देवून रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी 25 रोजी सावदा येथील विश्रामगृहावर संयुक्त बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत गेल्या दोन वर्षांपूर्वी साईबाबा मंदिर ते बस स्टँड कोचूर रोड पर्यंत जे काँक्रिटीकरण करण्यात आलं त्या रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर न टाकल्यामुळे तात्पुरते डांबरीकरण केल्याने मोटरसायकल अपघाताचे प्रमाण वाढले असता याबाबत तत्कालीन ठेकेदारास दूरध्वनी वरून बैठकीत चर्चा करता त्यांनी काँक्रिटीकरणाच्या मध्यभागी डांबरीकरण काढून काँक्रीट करून देण्याचे आश्वासन देऊन येत्या दोन दिवसात हे काम करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच
सावदा येथील विश्रामगृहावर महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावदा शहरातील नागरिक व पत्रकार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पत्रकार व नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाची झालेली चाळण लक्षात घेता सावदा येथील तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन,सावदा संस्थेच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 रोजी सावदा येथे मोठे आंदोलन उभारले गेले होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तात्काळ सुरू होईल व 25 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल अशा आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलनाला स्वल्पविराम दिला होता.
दरम्यान दि. २५ सोमवार रोजी सावदा येथे विश्रामगृहावर झालेल्या संयुक्त बैठकीत मोठ्या प्रमाणात नागरिक व पत्रकार उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार करत रस्त्यावर अनेक अपघात होऊन जीव जात आहेत.तुम्ही रस्ता दुरुस्तीसाठी किती लोकांचा बळी घेणार आहात, महामार्ग नेमका दुरुस्त कधी होणार आहे. किती रुपये या महामार्गावर केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत आधी अधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी नागरिकांनी लावून धरली त्यामुळे दोघं अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली.
बैठकीदरम्यान येथे आठ दिवसांमध्ये सावदा शहर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर परिसरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे काम आठ दिवसात करण्यात येईल. असे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासित तेव्हा आंदोलकांचा रोष कमी झाला. येत्या 4 ॲक्टोबर23 पर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येईल न केल्यास येत्या 5 तारखेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीत अधिकारी जबाबदार राहतील.असा संबंधित अधिकारी याचे उपस्थित देण्यात आला.
यावेळी आ. शिरीष चौधरी,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ,नंदू महाजन भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या शमीभा पाटील,तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी व्हि के तायडे ,सावदा मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, सावदा मंडल अधिकारी विनोद वानखेडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शाखा अभियंता चंदन गायकवाड,ताप्ती सातपुडा जनरल लिस्ट संस्थेचे अध्यक्ष शामकांत पाटील,प्रवीण पाटील ,कमलाकर पाटील ,पंकज पाटील, आत्माराम तायडे ,लाला कोष्टी ,रवींद्र हिवरकर ,राजेंद्र भारंबे, जितेंद्र कुलकर्णी,शेख साजिद,राजू दिपके यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भ्रमणध्वनीवरून अधिकारी व आंदोलकांशी चर्चा केली.

काँग्रॅटीकरणाचा प्रस्ताव पाठवा
सावदा शहर साईबाबा मंदिराजवळ,एलआयसी इमारती जवळ, सावदा फैजपूर एमआयडीसी जवळ,फैजपूर कब्रस्तान जवळ रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असतात त्यामुळे,कायमस्वरूपी तोडगा काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी काँग्रेटी करण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि केंद्राकडे सादर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *