जिवनात मिळालेल्या सर्व संधींचे सोने करत केवळ सामान्य जनतेची, शेतक-यांची सेवा व विठ्ठलाची, आईसाहेब मुक्ताईची भक्ती करत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्वतःच्या कर्माने वेगळी ओळख निर्माण केली. स्व. प्रल्हादराव पाटील
विशेष म्हणजे त्यांनी बोदवड व बोदवडलगतभागात शेती साठी पाणी उपलब्ध करून शेती सुजलाम सुफलाम केली, कायम दुष्काळ असलेल्या भागात, लोक १९८० व ९० च्या दशकात बागायती, कपाशी व केळी सारखे पीक घेऊ लागले होते ह्या भागात त्यांनी हरीतक्रांती घडवून आणली होती.
शिक्षणाची सोय करणेसाठी शाळा-कॉलेज त्यांनी उभे केलेत.
उद्योगाला चालना मिळावी म्हणून त्यांच्या नेतृत्वात सहकार तत्वावर याच भागात स्टार्च फॅक्ट्री उभी झाली हजारो युवकांना नोकरी, रोजगार मिळाला . जिल्ह्यातील सहकारी तत्वावर सूतगिरणी, साखर कारखाने असे विविध संस्था – कारखाने सुरळीत सुरू होते.
देशाचे नेते स्व यशवंतराव चव्हाण, व त्यानंतर मा शरदचंद्रजी पवार साहेबांचे नेतृत्वात त्यांनी सामाजीक कार्य केले. महा. शिखर बॅंकेचे ते ३ वर्ष अध्यक्ष होते. जळगांव जिल्हा बॅंकेचे ते अनेक दशके संचालक होते, व सुमारे १५-१६ वर्ष अध्यक्ष होते, त्याकाळात बॅंकिंग व्यवस्था केवळ काही तालुक्यांवर उपल्बध होती, शेतक-यांना, सामान्य जनतेला पुरेसा पतपुरवठा उपलब्ध नव्हता, सावकारी कर्जाच्या विळख्यात त्या काळातील लोक भरडले जात होते. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात विविध गावांत, जिल्हा बॅंकेच्या शेकडो शाखा त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उघडल्या व शेतक-यांना नविन संजिवनी दिली. अधिकाधिक कर्जपुरवठा उपल्बध करून दिला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना दिलासा मिळाला. सध्या जळगांव येथील रिंगरोडवर जिल्हाबॅंकेची भव्य वास्तू त्यांच्या दूरदृष्टितून, त्यांच्याच कार्यताळात उभी झाली. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळात शिखर बॅंकेला आशिया खंडातील सर्वोत्तकृष्ठ बॅंकांपैकी एक म्हणून नावाजले गेले होते.
श्री संत मुक्ताबाई तापी तिरी विज पडून लुप्त पावल्या तेथे शेकडो वर्षांपासून उभे असलेले आईसाहेब मुक्ताईंचे मंदीर त्याकाळात हतनूर धरणा मुळे दर वर्षी पाण्याखाली जायचे, अनेक वारकरी भाविक-भक्त दर्शनापासून उपेक्षित रहायचे त्यांच्या भावना समजून संस्थानचे विश्वस्त व अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वात लोकसहभागाने मुक्ताईनगर येथे बोदवड रोडवर त्यांनी भले मोठे मुक्ताईंचे मंदीर बांधले. पंढरपूरची त्यांची आषाढी वारी कधीच चुकली नाही. तेथे देखील मुक्ताई संस्थानच्या मठाचा विस्तार करत वारक-यांच्या निवासा साठी नवीन खोल्यांची इमारत देखील त्यांनी बांधली होती.
अशी बहू आयामी प्रतिमा असलेल्या आमच्या बापूंनी खर्या अर्थाने पुरोगामी विचाराने चालत, काळापलीकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवून विविध संस्थांचे नेतृत्व करत आपले कार्य सिद्धीस नेले. ०३/१०/२००४ रोजी या मुक्ताई सुपुत्राची आईसाहेब मुक्ताईंच्या मंदिरात त्यांची प्राण ज्योत मावळली.
हजारो युवकांना त्यानी नोकरी-रोजगाराची संधी उपलब्ध करून देतांना त्यांनी कुठलाही भेदभाव न करता, कुठलिही अपेक्षा न ठेवता, सर्व प्रकारच्या समाजातील लोकांना समान वागणूक दिली. अशा अनेकांच्या घरी, ऑफिस मध्ये आजदेखील मला स्व.प्रल्हादभाऊंचा फोटो बघायला मिळतो, कुठेतरी – कुणीतरी त्यांची कायम आठवण काढतात
त्यांना आजदेखील लोक वारकरीभुषण, सहकारमहर्षी, कर्मयोगी, बोदवड भागातील लोक हरितक्रांतिचे प्रणेते, अशा विविध उपाधींनी गौरवितात तेव्हा अत्यंत अभिमान वाटतो.
त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या अमर आत्म्यास विनम्र अभिवादन!