सावदा;खतांच्या मालधक्यासह केळी वाहतुकीसाठी किसान एक्स्प्रेस सुरू होणार – आ.चंद्रकांत पाटील

सावदा/प्रतिनिधी मुक्ताईनगर मतदारसंघातील कोरोना काळात बंद केलेले थांबे , सावदा येथील प्रलंबित मालधक्का तसेच सावदा येथून केळी वाहतुकीसाठी किसान एक्सप्रेस सुरू करण्यात यावी या मागण्यासाठी जिल्ह्यातील चार ते पाच आमदार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळ रेल्वे विभागीय अधिकारी (DRM) यांची रविवार दि.२१रोजी भेट घेतली आहे. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ,आ.संजय सावकारे,आ.मंगेश चव्हाण,आ.चंद्रकांत पाटील यासह महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड,सावदा व निंभोरा स्टेशन या रेल्वे स्टेशनवर कोरोना काळात बंद झालेल्या प्रवासी रेल्वे गाड्यांना पूर्वी प्रमाणे थांबा मिळावा, सावदा येथे रासायनिक खतांचा मालधक्का तयार करून तेथे रासायनिक खते उतरवण्यात यावी. जेणेकरून केळी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा सुटेल. देशामध्ये सर्वाधिक रासायनिक खते जळगाव जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर असून रावेर,यावल आणि मुक्ताईनगर या तीन तालुक्यांना सुमारे अडीच लाख मेट्रिक टन खते दरवर्षी लागत असतात.रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये रासायनिक खतांचा मालधक्का नसल्याने जळगाव,चाळीसगाव व  प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून रासायनिक खते या भागात आणावी लागत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत असतो. त्यामुळे लवकरात लवकर सावदा येथे रासायनिक खतांचा मालधक्का कार्यान्वित व्हावा. कोरोना काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हित लक्षात घेऊन शेतमाल वाहतुकीसाठी किसान एक्सप्रेस सुरू केली होती. ही किसान एक्सप्रेस सुरू व्हावी म्हणून सर्व आमदार व खासदारांतर्फे डीआरएम इथे पांडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच मागण्या पूर्ण होणार आहे असे आ. पाटील यांनी सांगितले आहे.

*लवकरच रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक*
जळगाव जिल्ह्यातील आमदार व खासदार यांची लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री श्री वैष्णव यांच्यासोबत बैठक घेऊन जळगाव जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या त्यांच्याकडे मांडून त्या सोडवल्या जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *