सावदा/प्रतिनिधी हवामान आधारित फळपिक विमा योजनेचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्यास दिनांक १३ /१०\२॰२३ शुक्रवार १वाजता
राष्ट्रवादी कार्यालया जवळुन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जिल्हास्तरीय शिंगाडे मोर्चा कढण्यात येणार आहे. अशी माहिती सोपान पाटील यांनी दिली आहे.मोर्चाच नेतृत्त्व जिल्ह्याचे माजी मंत्री वरीष्ठ नेते एकनाथराव खडसे, अरूणभाई गुजराथी , जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री देवकर आप्पा,डाॅ.सतिष पाटील ,मा.आ.अरूण पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे,सोपान पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सेल जळगाव,अशोक लाडवंजारी महानगराध्याक्ष, जिल्ह्यातील सर्व विभागाचे राष्ट्रवादी काग्रेसचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहे.
पात्र विमा धारक शेतक-यांचे देय रक्कम त्वरित देवुन हिताचा निर्णय व्हावा ही विनंतीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना
सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सेल जळगाव वदनाताई चोधरी
अशोक भाऊ लाडवंजारी अशोक आप्पा सोनवणे सलीम इमानदार संजय चव्हाण उमेश पाटील शितल म्हसाने बापु सोनवणे संजय जाधव आकास हिवाळे हितेश जावळे मतिन सेय्य्द वर्षा राजपूत इत्यादी हजर होते
वरील मागणीचे निवदन मुंख्यमंत्री कृषिमंत्री पालकमंत्री मदत पुनर्वसन आपत्ती व्यावस्थापन मंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव कृषी फलोत्पादन राज्य व्यावस्थापन विमा कंपनी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिक्षक पोलिस आधिक्षक जिल्हा विमा प्रतिनिधी पोलीस निरीक्षक जिल्हापेठ रामानंद तहसीलदार रावेर व तालुका कृषी अधिकारी इत्यादीना दिले आहै
निवेदनात म्हटले आहे की,
जळगाव जिल्ह्यातील रावेर.यावल.मुक्ताईनगर. चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळ पिक विमा केळी उत्पादक पात्र शेतक-यांना पिकविम्याचे मंजूर रक्कम सरसकट त्वरीत मिळणेसाठी दिनांक 22/9/2023 शुक्रवार रोजी मोर्चा काढण्या बाबत कळविले होते. त्यानूसार तहसीलदार रावेर व तालुका कृषी अधिकारी यांच्या सोबत
बैठक होवुन जिल्ह्यातील वरिष्ठ आधिकारी याच्याशी संपर्क करून जिल्हा अधिक्षक जिल्हाकृषी आधिकारी यांनी विमा धारक शेतक-यांना मुद्दा क्र.८
मधील अनु.क्र.९नुसार योजनेचा लाभ कधीपर्यंत द्यावा या विषयी नमूद करण्यात आले आहे. त्यानूसार संबंधित पिकाचा हवामानाचा धोका संपल्यानंतर त्यात कमी तपमान व जास्त तपमान व विमा अनुदान हप्ता प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्यात पात्र शेतक-यांना रक्कम वितरीत करणे क्रमप्राप्त असते.व आवश्यक आहे.
त्यामुळे सरसकट विमा रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची आपली मागणी मान्य करून विमा शेतक-यांच्या खात्यावर करण्याचे मा.राज्य व्यवस्थापक अँग्रिकल्चर इन्सुरन्स कंपनी आँफ इंडिया मुंबई व जिल्हाविमा प्रतिनीधी जळगाव यांना लेखी सुचना दिल्याचे जिल्हाकृषी आधिकारी यांनी तालुका कृषि आधिकारी मार्फत कळवुन मोर्चा रद्द करण्या विनंती केली होती. ना.अनिल पाटील मदत पुनवर्सन आपत्ती व्यावस्थापन मंत्र्यांनी जिल्हाधिकारी व कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेबां सोबत विमा कंपनीची बैठका घेवुन त्यात तोडगा निघाला नाही ते नवखे मंत्री आसल्यावर सुध्दा शेतक-यांना न्याय देण्याची भुमिका बजावून त्यांनी प्रयत्न केला परंतु मंत्री मंडळाच्या बैठकीत कंपनीने शेतक-यांची बदनामीचा व खोटे पत्रव्यवहार करून गुगल मॅप वरून महीती घेणै संबंधी वर्तमान पत्रातुन समजले दररोज जिल्ह्यातील मंत्री खासदार नवनविन सांगुन विमा धारक शेतक-यांना समभ्रमात टाकुन दिशाभूल करीत आहे कृषिमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विमा कंपनीने एकतरफा बाजु मांडून शेतक-यांना बदनाम करून परत सर्वे करण्यात विमा कंपनी यशस्वी झाल्याचे आलेल्या बातम्यांमुळे कळते. शेतक-यांची बाजु मांडणे मध्ये जिल्ह्याचे पालक मंत्री व मंत्री गिरीष महाजन महोदय अपुर्ण पडले तसेच अनुभवी शेतकरी किंवा शेतकरी प्रतिनिधी निमंत्रित नव्हते तसेच शेतक-यांच्या गंभीर प्रन्स आसल्यावर सुद्दा जिल्ह्यातील निवडुण आलेल्या एकाही लोक प्रतिनिधीने शेतक-यां विषयी आवाज न ऊठवणे ही शोकांतिका आश्चर्यची व विचार करण्याची बाब आहे. मंत्री महोदय गिरीष महाजन यांच्या म्हणण्यानुसार ई पिकपेरा अहवाल ग्राह्य धरण्याच्या वक्तव्याचा शेतक-यांना विस्वास होता.मंत्रिमंडळ बैठकीत कंपनीस झुकते माफ मिळाले त्यामुळे शेतक-यांवर एकप्रकारे अन्यायच झाला आहे. खासदार रक्षाताई यांच्या म्हणण्यानुसार ४३ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याच्याही कालावधी साठी शेतकरी वाट पाहून आहे व उर्वरीत शेतक-यांच काय !
पात्र शेतक-यांना सरसकट केळी पिकविम्याचे मंजूर रक्कम शेतक-यांच्या खात्यावर सरकार व विमा कंपनीने जमा करणे नियमाप्रमाणे देणे क्रमप्राप्त झाल्यावर कंपनी सरकारची दिशाभूल करून शेतक-यांना फसवित आहे पिक विमा कंपनीचा पळताळणीचा कालावधी नियमाप्रमाणे दिलेल्या वेळा पत्रकानुसार कधिचाच संपला आहे. आज पडताळणी कशाची कोणत्या पिकाची करणार केळी पिकाचा कालावधी दहा ते बारा महीन्याचा आसतो.केळी पिक बारमाही होत आसते. विमा काढण्याची ३१ आक्टोंबर शेवटची मुदत असते विमा कालावधी ३१ जुलै आखेर आसतो. नऊ महीने विमा संरक्षण केळीस मिळत. आज सर्वे करण्यात आला तर पिकपेरा नविन येईल त्यात तफावत दिसतील कंपनी शेतक-यांच्या व सरकारचा विस्वास घात कंपनी करीत आहे त्याच एकच कारण वाटते या वर्षी निसर्गाच्या आवकृपेने शेतक-यांचे फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.कमी तपमान, जास्त तपमान,वादळ, गारपिट यामुळे चौघ ट्रिगरचे वेळेत निकषात नुकसान झाले.नुकसान मुदतीत दिलेल्या नियमामुळे सुदैवाने शेतक-यांना कमी तपमान व जास्त तपमानचे जिल्ह्यातील सर्व सर्लकला सत्तर हजार रू.हेक्टरी व काही सर्कल मध्ये वादळामुळेचे नुकसानास हेक्टरी सत्तर हजार रू. व गारपिटीचे काही शेतक-यांना सेहेचाळीस हजार सहाशे रूपये याप्रमाणात विमा कंपनीने सर्व पात्र शेतक-यांना नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त झाले आहे.सत्तर हजार, एक लाख चाळीस हजार, एक लाख सोळा हजार वरील प्रमाणे नुकसान नुसार भरपाई देण क्रमप्राप्त आहे यावर्षी जास्तीच्या रकमा कंपनीस देणे जिवावर येत आहे पात्र शेतक-यांना नियमा व निकषांनुसार ठरलेल्या वेळा पत्रकानुसार पात्र ठरलेले शेतक-यांच्या हक्काचे पैसे १२ टक्के विलंब आकारासह मिळण्यासाठी शेतक-यांनी पक्षव्देश न करता शेतकरी आमची जात शेतकरी आमचा धर्म शेतकरी आमचा समाज या भावनेने एकदिलाने एकविचाराने आपला हक्कासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र केळी पिक विमाधारक शेतकरी समाजाने शासनास भानावर आनने साठी जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयावर भव्य शिंगाडे मोर्चा काढण्या साठी मोठ्या संख्येने शेतक-यांनी शेतक-यांनी शिंगाडे केळी फणी केळीचे पिल आपले गाव तालुक्याचे बँनर लावुन शेतक-यांनी बहुसंख्येने मोर्चा त हजर रहावे अशी विनंती सोपान पाटील यांनी केली आहे
पिक विमा न मिळाल्यास तेरा रोजी राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा
