सावदा/प्रतिनिधी मध्यप्रदेश राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यात तीन डिसेंबर रोजी निवडणूक निकाल हाती येणार आहेत. भारतीय जनता पार्टी कडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या असून बऱ्हाणपूरच्या माजी आमदार तथा माजी मंत्री अर्चना चिटणीस उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. अर्चना दीदीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून दीदीचा पत्ता कापला तर जाणार नाही ना ? अशा चर्चा बऱ्हाणपूर विधानसभा मतदार क्षेत्रात रंगू लागल्या आहेत.
बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपा तर्फे श्रीमती अर्चना चिटणीस, मनोज लधवे, मनोज तारवाला, हर्षवर्धन चव्हाण यांच्यात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असून काँग्रेस कडून उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान आमदार सुरेंद्रसिंग ठाकूर(शेरभैय्या), काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजय रघुवंशी, शहापूर येथील इंद्रसेन देशमुख यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजप आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी या इच्छुकांपैकी कुणाला उमेदवारी देते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
अर्चना दीदीचा पत्ता कापला जाणार..?
