चिनावल/प्रतिनिधी येथील दोन शेतकऱ्यांचे दि २९ चे रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी सुमारे १००० केळी खोड कापल्याने दोघं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुळे चिनावल परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजून शेतकरी भयित झाले आहे .
चिनावल शिवारातील सावखेडा रस्त्यावर असलेल्या गट न.७५४ हा गौरव किशोर बोरोले यांनी नफ्याने केलेल्या शेतात लागवड केलेल्या केळी बागातील सुमारे ७०० ते ८०० तर शेजारच्या लिनय विकास बोंडे यांच्या केळी बागातील सुमारे 100 केळी खोड अज्ञात व्यक्तींनी कापून नुकसान केले आहे या मुळे दोन्ही शेतकऱ्या लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने चिनावल परिसरात खळबळ माजली आहे गेल्या दिड ते दोन वर्षांपूर्वी ही चिनावल परिसरात अशा केळी खोड कापून नुकसान करण्याची मालिका च सुरू झाली होती या मुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.आज घडलेल्या घटनेची पोलिसांनी कसून तपास करून शेतकऱ्यांना सुरक्षा द्यावी व मागील प्रमाणे अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये या साठी अज्ञात आरोपी चा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान या घटने बाबत दोघं शेतकऱ्यांनी सावदा पोलिसांना माहिती दिली आहे सावदा पो स्टे चे सपोनि विशाल पाटील , पो उप नि अमोल गर्जे तसेच हे.कॉ.विनोद पाटील,विनोद तडवी,मझहर पठाण व पोलीस कर्मचारी तपास करीत आहे.
चिनावल येथे केळी खोड कापून शेतकऱ्यांचे नुकसान
